Ad will apear here
Next
‘आरपीआय’चा ६१वा वर्धापनदिन सोहळा तीन ऑक्टोबरला
मुंबई : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आरपीआय) ६१वा वर्धापनदिन तीन ऑक्टोबरला ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या वेळी ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष तीन ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापन करण्यात आला. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाविरुद्ध देशातील प्रबळ व्यापक विरोधी पक्ष म्हणू सर्व समावेशक रिपब्लिकन पक्ष उभारण्याची डॉ. आंबेडकर यांची संकल्पना होती. त्यानुसार सर्व जातीधार्मियांचा पक्ष म्हणून सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदा ‘आरपीआय’चा ६१वा वर्धापनदिन असून, हा सोहळा ठाण्यातील हायलँड मैदानात होणार आहे,’ अशी माहिती आठवले यांनी दिली.

‘या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले भूषवणार असून, या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZXZBT
Similar Posts
‘मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या’ मुंबई : ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
‘डॉ. पानतावणेंचे औरंगाबादमध्ये स्मारक उभारणार’ मुंबई : ‘आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृती चिरंतन जोपासण्यासाठी औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल,’ अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय
मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुखांची सदिच्छा भेट मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (२३ मे २०१९) मुंबईत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी भेट झाली.
‘भाजपने वचन पाळले, फडणवीस सरकारचे अभिनंदन’ मुंबई : ‘सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले वचन पाळले आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘भाजप’ प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी व्यक्त केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language